तोडोळी येथील शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित
आमदार विलास बापू भुमरे यांची यशस्वी मध्यस्थी

छत्रपती संभाजी नगर.पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना भाग एक टप्पा दोन योजनेचे तोंडोळी कॅनलला पाणी सोडणे कामी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा सज्ज आहे.त्यामुळे दिलेली आंदोलकांची मुदत संपल्यामुळे दि.४ मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ब्रम्हगव्हाण येथील वाळूज एमआयडीसी ला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊस बाजूला जलसमाधी आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येणार होते.परतू पैठण तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांनी आंदोलक व लघु पाटबंधारे विभागाच्या कनिष्ठ ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत समन्वय घडवून आणल्याने आजघडीला होणारे जल समाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून येत्या आठवड्यात सदरील कॅनला पाणी सोडण्यात येणार असल्यामुळें सदरील आंदोलकांनी आपले जलसमाधी हत्यार तुर्तास बाजूला ठेवले आहे.आठवड्यात भरात तोडोळी परीसरात कॅनला पाणी सोडण्या येणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे.उपअभियंता विठ्ठल गावंडे, अभियंता प्रशांत कोरके आदींनी आंदोलकांसोबत सकारात्मक चर्चा घडवून आणल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.