महाराष्ट्र

आखेगाव व परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस 

शेती सोलर पंप व पिकांचे अतोनात नुकसान 

मधुकर केदार अहमदनगर. सात रोजी सायंकाळी आखेगाव व परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, वादळ भरपूर प्रमाणात झाल्याने विहिरीवरील बसवलेले शेती सोलर पंप वादळामुळे कोलमडून पडले त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याचबरोबर उभे असलेले व काढणीस आलेले बाजरीचे पीक भुई सपाट झाले, उसाचे पिकाचे देखील नुकसान झाले, बाजरीचे पीक काढणीस आल्याने बाजरीच्या पिकाचे देखील भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे, त्याच बरोबर घरांच्या छतावरील पत्रे देखील काहींचे उडून गेले , अचानक आलेल्या अवकाळी पाऊस वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोलर पंपाचे जास्तीचे नुकसान झालेले आहे त्यांचे कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून दखल घ्यावी अशी आखेगाव व परिसरातील शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp