डोंगर दर्यातील तरुण पोचला दिल्लीच्या दरबारी बिरुदेव डोणेनी UPSC परिक्षेत मिळवलं मोठं यश
मेढपाळाच्या मुलांची IPS पदी निवड

छत्रपती संभाजी नगर.कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील यमगे गावातील बिरुदेव डोणे शेतकरी कुटुंबात जन्मलेला तरुण मेंढपाळीवर उदरनिर्वाह करुन आपल्या मुलांची शैक्षणिक धुरा सांभाळणारे आई-वडील आणि डोंगराळ भागातील तुटपुंज्या साधनसंपत्तीमध्ये वाढलेले बिरुदेवचे बालपण या सगळ्यातूनच मार्ग काढून बिरदेवनी UPSC सारख्या देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत ५५१,वा क्रमांक मिळवून इतिहास घडवला आहे.
बलपणापासूनच परिस्थितीशी झगडत शिक्षण घेत असताना, घरात अभ्यासासाठी जागा नव्हती, ना योग्य साधने. तरीही तो शाळेच्या व्हरांड्यात अभ्यास करत राहिला. दहावीला त्याने ९६ टक्के गुण मिळवले आणि बारावीला विज्ञान शाखेत ८९ टक्क्यांसह उत्तीर्ण झाला. हीच त्याची शैक्षणिक वाटचाल पुण्याच्या प्रसिद्ध सी ओ ई पी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत पोहोचली, जिथे त्याने स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली.
आपल्या मुलांना शिकवण्यासाठी समाज खूप काही करतो, पण एक मेंढपाळाचा मुलगा जेव्हा UPSC ची स्वप्नं पाहतो, तेव्हा ती फक्त त्याची नसतात, तर संपूर्ण गावाची, समाजाची होतात. बिरुदेवने दोन वेळा UPSC परीक्षेत अपयश स्वीकारलं, पण हार मानली नाही. तिसऱ्या प्रयत्नात, त्याने ५५१ वी रँक मिळवली आणि आयपीएस अधिकारी बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
UPSC निकाल लागला तेंव्हा बिरू डोणे मेंढरं चारत होते या यशाची बातमी त्याला मिळाली तेव्हा तो आपल्या मेंढरा सोबत रान माळावर डोंगरात होता. स्वतःच्या मेहनतीवर, आई-वडिलांच्या आशिर्वादाने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवत महापुरुषांच्या विचार धारेवर त्याने हे यश आपल्या जिद्दीने प्राप्त केले. त्याच्या या यशाने केवळ यमगे गावच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र अभिमानाने भारावून गेला.
बिरुदेव डोणे यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. शिक्षण हे कुणाच्या परिस्थितीवर अवलंबून नसतं, तर इच्छाशक्ती, चिकाटी आणि जिद्द अपार मेहनतीवर अवलंबून असतं, हे त्याने सिद्ध करून दाखवलं आहे. स्वप्न पाहणं महत्वाचं नसतं, तर त्याला सत्यात उतरवण्यासाठी लढणं महत्त्वाचं असतं त्याचा यश आजघडीला खरा अर्थ सांगतं आहे.
बिरुदेव तुझं यश आज लाखो तरुणांना सांगतंय ऊठ बहुजना जागा हो शिक्षणाचा धागा हो.स्वप्न मोठं बघा… परिस्थिती नाही तर जिद्द यशाचं मोजमाप ठरवते. त्यासाठी महाराष्ट्रातील तरुणाने बिरुदेव सारखे यश प्राप्त आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करुन एक आदर्श निर्माण करावा.समाजातील एक व्यक्ती घडला तर तो समाजासाठी व येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो.बिरुदेव तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे.तुझ्या या यशाबद्दल A1 CID NEWS च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन !